Saturday, November 28, 2015

बाई हा देश तुमच्यासाठी नोहेच.....

या देशात असहिष्णुतेचं वातावरण असल्याचा बोभाटा काही मोजके लोक करताहेत. साहित्यिक अरुंधती राॅय या देखिल त्यातल्याच एक. आज पुण्यात त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देतानाच्या लेखी आणि तोंडी भाषणात त्यांनी जे तारे तोडले ते पाहून मनात प्रश्न आला की असं असताना मग या बाई या देशात कशासाठी राहताहेत.....
 या कार्यक्रमात त्या ज्या काही बोलल्या किंवा ओकल्या त्यातले हे काही ठळक मुद्दे - -
 - फॅसिझमच्या लाटेविरुद्ध राजकीय आघाड्या करणं आवश्यक आहे - 
- अस्पृश्यांसाठी हिंदू धर्म हा दहशतीची बंद कुपी आहे - 
 - सत्तेवर असलेलं निर्लज्जपणे म्हणतात की हे हिंदू राष्ट्र आहे...आणि ते सिद्ध करण्यासाठी - अभ्यासक्रम बदलले जाताहेत....न्यायपालिका, पोलीस खातं, गुप्तचर विभाग यांच्यात हिंदुत्वाचे भाट नेमण्यात येत आहेत.... 
 - जातीय व्यवस्था ही हिंदू संस्कृतीची महानतम देणगी आहे यावर महात्मा गांधीं यांचा विश्वास होता...त्यामुळंच त्यांनी डाँ. आंबेडकरांना पुणे करार करायला भाग पाडलं...या कराराची किंमत दलित आजही मोजताहेत.... 
 - बाजीराव मस्तानी चित्रपटाबाबत वाद निर्माण केला जायोत...पण पेशव्यांच्या राज्यात दलितांची स्थिती काय होती हे कुणी विचारणार की नाही  -
 अनिष्ट प्रथांविरुद्ध बोलणं हे देशातल्या लेखकांसाठी प्राणघातक ठरतय. विचार व्यक्त करणारांना गोळ्या घालून शांत केले जातय. पोलिसांच्या संरक्षणात आम्हाला काम करावे लागतय, अशी स्थिती असेल, तर आम्ही विचार कसा करणार?...आणि त्याचाच निषेध म्हणून पुरस्कार परत केले जाताहेत
 - देशातले उद्योग सहा टक्ंके बनिया आणि ब्राह्मणांया हातात आहेत. प्रसारमाध्यमंही बनिया आणि ब्राह्मणांच्या हातात आहेत. ही माध्यमं मुख्यतः बनिया, ब्राह्मण किंवा अन्य प्रभावशाली जातींतल्या पत्रकारांनाच नोकरीवर ठेवतात. 

खरोखरच या देशात एवढं सगळं वाईट सुरु आहे हे त्यांच्या भाषणामुळं नव्यानंच कळलं आणि त्यांना हे दिसतय म्हणजे ते खरंच असणार ना? पण आम्हाला हे काही दिसत नाही. कदाचित राॅय बाईंना दिव्यदृष्टी प्राप्त झाली असावी. असं असेल तर मग बाई हा देश आपला नोहेच असंच त्यांना उद्देशून म्हणावं लागेल.

No comments:

Post a Comment